Speed News 24x7 Live
ताजी बातमी .. ताजी चर्चा ...
Register
Breaking : bolt
धनश्री जोशी यांची समर्थ अवॉर्ड साठी निवड...रेखा काटे यांची समर्थ अवॉर्ड साठी निवड...संकेत सोनवणे यांची समर्थ अवॉर्ड साठी निवड...संत गोरोबा काका किंवा आयुर्वेद हेल्थ केअर शॉपीचे उद्घाटन संपन्न...संत गोरोबा काका किंवा आयुर्वेद हेल्थ केअर शॉपीचे उद्घाटन संपन्न... पल्लवी गायकवाड यांची समर्थ अवॉर्ड साठी निवड...अजितदादांच्या मुख्यमंत्री होण्याच्या इच्छेवर जयंत पाटलांचा टोला... 10वी-12वी बोर्ड रिझल्टबद्दल ताजे अपडेट्स काय...?भरतशेठचा अजित दादांना मुख्यमंत्री होण्याच्या विधानावर चिमटा... पशुसंवर्धन विभागाच्या विविध लाभाच्या योजनांसाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करा - जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रमोद बाबर

जाहिरात

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय; मुंबईकरांना मिळणार .... 

schedule06 Jan 25 person by visibility 191 categoryPolitics

मुंबईत लोकल प्रवास करणे एक युद्धच असते. लोकलची संख्या वाढल्यानंतर गर्दी कमी होत नाही. त्यामुळे मुंबईत लोकलप्रमाणे इतर पर्याय तयार केले जात आहेत. मुंबईत मेट्रो प्रकल्प सुरु आहे. परंतु मेट्रोचे सर्वात मोठे नेटवर्क दिल्लीत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत मेट्रो कनेक्टीव्हीटीसाठी नवीन टारगेट सेट केले आहे. महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच एमएमआरडीएला दरवर्षी 50 किलोमीटर मेट्रो नेटवर्क सुरु करण्याचे टारगेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. मुंबईत सध्या 59.19 किलोमीटर मार्गावर मेट्रो सुरु आहे. तसेच 143.65 किलोमीटर मार्गावर काम सुरु आहे. दुसरीकडे दिल्लीत 351 किलोमीटर रेल्वे नेटवर्क सुरु झाले आहे. तसेच 65 किलोमीटर नेटवर्कचे काम सुरु आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी मेट्रो प्रकल्पांचा आढावा घेतला. यावेळी प्रकल्पांच्या  कामाला उशीर होऊ देऊ नका, असे स्पष्ट निर्देश त्यांन दिले. तसेच काम पूर्ण करण्याची डेडलाइन तयार करा, दरवर्षी 50 किलोमीटर मेट्रो लाईन सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरु झाली पाहिजे. असेब त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. मुंबईतील अनेक मेट्रो प्रकल्प रखडले आहेत. त्यामुळे फडणवीस यांनी मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटीला नवीन डेडलाइन निश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणची समीक्षा बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ उपस्थित होत्या. यावेळी फडणवीस यांनी सांगितले की, अनेक ठिकाणी कार शेड विना मेट्रो सुरु आहे. त्यासाठी प्रतिक्षा करु नये. जगभरात असे प्रयोग होत आहे. त्याचा अभ्यास करा, असे फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.
 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Speed News 24x7 Live.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes